रेल्वे स्थानकावरील पुल कोसळल्याने प्रवासी जखमी

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील घटना

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्यातील मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओडख असलेल्या बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील पुल अचानक कोसळल्याने 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज घडली.

हा अपघात इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले असून उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवसी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी सर्व प्रवासी अत्यवस्थ असल्याचे आढळुन आलें असुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे.

वृत्त लिहिस्तोवर कुठलीही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नसून जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.